नमस्कार !
मन हे निर्मितीक्षम असते मनामध्ये अनेक विचार येत असतात आणि जात असतात, आपल्या आजूबाजूला ही घडणाऱ्या गोष्टीन चा आपल्या मनावर परिणाम होत असतो ,काही घटना न मुळे आपल्याला त्रास ही होतो.
मन हे निर्मितीक्षम असते मनामध्ये अनेक विचार येत असतात आणि जात असतात, आपल्या आजूबाजूला ही घडणाऱ्या गोष्टीन चा आपल्या मनावर परिणाम होत असतो ,काही घटना न मुळे आपल्याला त्रास ही होतो.
पण कधी तुम्ही ह्या गोष्टी चा विचार केला आहे का कि हे अस का घडत? किव्हा तुम्ही खूप वेळा बोलताना ऐकलेलं असत मला अमुक घडेल अस वाटतच होत आणि ते घडल ..... कधी याचा विचार केलाय अस का होत ते?
ह्या च कारण अस आहे कि जग हे विचारांवर चालत. कोणती ही गोष्ट कुणीच विचार न करता करूच शकत नाही.प्रत्येक गोष्ट जगात दोनदा घडते,ती गोष्ट पहिल्यांदा मनात घडलेली असते आणि नंतर प्रत्यक्षात घडते.
अगदी साध रोजच्या जीवनातील उदाहरण आपण बघू या. जेव्हा आपल्याला काही खरेदी करायची असते तेव्हा आपण मार्केट मध्ये गेल्यावर आपल्याला कोणत्या दुकांत जायचं आहे,कोणत्या ब्रांड ची वस्तू घ्याययची आहे किती बजेट असणार आहे हे सगळ ठरलेल असत कारण आपण आधीच मनात विचार केलेला असतो.
आपण अजून एखादे उदाहरण पाहू या.
सर्वसामान्य लोकांमध्ये मुलांनी काही हट्ट केला आणि तो पुरवणे आई वडिलांना शक्य नसते तेव्हा ते सांगतात कि अरे आपल्याला होम लोन चे हप्ते आहेत,इतर महिन्याचे खर्च आहेत म्हणून तुझा हट्ट पुरवण शक्य नाही. ह्या प्रसंगामध्ये आई -वडील त्यांच्या समोर असणाऱ्या अडचणीचाच आणि मर्यादांचाच विचार करताना दिसतात त्यामुळे त्याचं मन त्याच गोष्टीना प्रतिसाद देते.म्हणून त्या अडचणींवर मार्ग काढायच्या ऐवजी आपण आपल्या इच्छा कश्या पूर्ण नाही करू शकत हेच नकळत मुलांना शिकवतो.
म्हणजेच जो आपण विचार करतो त्या गोष्टीना आपल मन प्रतीसाद देत असत.मग आपण संपत्ती निर्माण साठी जाणीवपूर्वक विचार केला तर आपण ती नक्कीच मिळवणार आहोत नाही का ?
कारण आपल्या मन खूप सृजनशील आहे. जी तुमची स्वप्न आहेत,ध्येय आहेत त्या संदर्भात तुम्ही सतत जेव्हा विचार कराल
तेव्हा तुमच मन त्याला नक्की प्रतिसाद देईल आणि त्या प्रमाणे तुम्हाला संधी
प्राप्त होतील आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल.
पैश्याबाद्द्ल सकारात्मक विचार आणि
सकारात्मक दृष्टीकोण तुम्हाला तुमच ध्येय गाठण्यात मदत करेल.
धन्यवाद !!
श्रीमंत व्हा आणि सुखी व्हा!
धन्यवाद !!
श्रीमंत व्हा आणि सुखी व्हा!