नकारात्मक विचार ही बहुतेकदा मनाची सवय बनलेली असते.जेव्हा नकारात्मक
विचार आपल्या मनात येतात तेव्हा ते तसेच रेंगाळतात जो पर्यंत तुम्ही ते
जाणीवपूर्वक काढून टाकत नाहीत.निगेटिव्ह विचार हे सहसा प्रलोभनासारखे
असतात,प्रलोभानाची जशी आपलयाला भुरळ पडते तसच निगेटिव्ह विचारांची हि सवय असलेल्या
माणसाला भुरळ पडते.त्यामुळे ह्या निगेटिव्ह विचारांच्या मायाजालातून बाहेर
पडण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी करणे फार आवश्यक आहे.
तुमची देहबोली बदला,त्यातून कॉन्फिडन्स दिसूदे ,तुमच मन बोलून मोकळ
करा, थोडा वेळ मनात कोणते हि विचार न येऊ देता शांतपणे बसा.विचारांची दिशा
जाणीवपूर्वक बदला कारण बऱ्याचदा चुकीचा दृष्टीकोन हा निगेटिव्ह विचारांचा पाया
असतो.
फिरायला जा आणि तुम्हाला ज्या
ज्या गोष्टींचे आभार मानावेसे वाटतात त्या त्या गोष्टींचे आभार माना.
ह्या छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करून तुम्ही तुमच नकारात्मक विचारांनी भरलेलं मन रिकाम करा आणि
सकरात्मक विचारांनी ते भरून जाऊ द्या आणि श्रीमंतीच्या वाटे वर चालायला सुरुवात
करा.
No comments:
Post a Comment